जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ   

नवी दिल्ली : केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांना बुलेटप्रूफ मोटारही सुरक्षेसाठी देण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानातील संघर्षानंतर त्यांच्या सुरक्षेमध्ये तातडीने वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. शस्त्रसंधीनंतर जयशंकर यांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले जात आहे. परराष्ट्र मंत्री आणि कूटनितिज्ज्ञ, अशी त्यांची ख्याती आहे. जागतिक मंचावर भारताची भूमिका प्रखरपणे मांडणारे आणि प्रसंगी सडेतोड उत्तर देणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख आहे. 

Related Articles